कन्हान :- शहरातील युवा समाजिक कार्यकर्ता ऋषभ बावनकर यांची ग्राहक पंचायत महाराष्ट्र कन्हान शहर अध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याने समर्थकांकडुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
ऋषभ बावनकर यांनी सामाजिक कार्याची सुरू वात २०१४ मध्ये भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश करुन केली होती. २०१६ मध्ये त्यांनी कन्हान शहर विकास मंच ही सामाजिक संघटना स्थापन केली. संघटनेच्या माध्यमातुन आरोग्य रोगनिदान शिबीर घेणे, जन सामान्य नागरिकांच्या समस्या बाबत प्रशासनाला निवेदन देणे, महापुरुषांच्या जयंती निमित्त सामाजिक उपक्रम राबविणे, पत्रकार दिवस, शिक्षक दिवस, महिला दिवस या सारखे विविध सामाजिक कार्यक्रम नियमित घेत असतात. तसेच इलेक्ट्रॉनिक व पोर्टल मीडियाचा पत्रकारिता क्षेत्रात कार्य सुरु असुन आपल्या लेखणीचा माध्यमातुन जनसामान्य नागरिकांच्या समस्या, शहराचा सर्वांगीण विकासाचे प्रश्न, न्याय व्यवस्थेचे प्रश्न शासन, प्रशासना पर्यंत पोहचविण्याचे कार्य करीत आहे.
मागील वर्षी शहरातील दुकानदारांवर झालेल्या अतिक्रमण कारवाई मुळे ऋषभ बावनकर यांनी आपल्या पक्षा विरोधात सोशल मीडियावर पोस्ट केल्याने पक्षांनी त्यांना सहा वर्षा करिता निलंबित केले आहे. तरीही त्यांनी आपले सामाजिक चळवळ सुरुच ठेवली. सततच्या कार्यामुळे शहरात त्यांची राजकीय लोकांशी, सामाजिक कार्यकर्त्यांशी, सामान्य नागरिकांशी, शिक्षण क्षेत्रात फार ओळख निर्माण केली आहे.
ऋषभ बावनकर यांची सामाजिक चळवळ लक्षात घेत त्यांना नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात ग्राहक पंचायत महाराष्ट्र नागपुर ग्रामीण जिल्हाध्यक्षा कांचनमाला माकडे, पारशिवनी तालुका अध्यक्षा सुनिता मानकर यांचा हस्ते ऋषभ बावनकर यांना नियुक्ती पत्र देऊन कन्हान शहर अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. यावेळी कन्हान, कांद्री शहर विकास मंचच्या पदाधिका-यानी ऋषभ बावनकर यांचा शाॅल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
याप्रसंगी मार्गदर्शक भरत सावळे, नारायण गजभिये, सुर्यभान चकोले, अर्चना तांडेकर, सुषमा मस्के, रंजना किरपाने, मीना गिऱ्हे, जयश्री गडपाडे, प्रमोद गिऱ्हे, निखिल मेश्राम, शुभम बावनकर, अभिषेक साखरे, आयुष संतापे, यश शेंडे सह आदि सदस्य उपस्थित होते.
ग्राहकांना योग्य न्याय मिळवुन देऊन समस्या दुर करण्याचा प्रयत्न राहील – ऋषभ बावनकर
व्यवसायांसाठी ग्राहक हे राजासारखे असतात, त्यामुळे त्यांना समाधानी ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. दुकानदारांनी ग्राहकांशी संवाद, वागणुक चांगली दिली पाहिजे. ग्राहक हा बाजारपेठेचा केंद्रबिंदु असतो, त्यामुळे तो वस्तु किंवा सेवा स्वतःसाठी वापरतो किंवा इतरांना देतो, पण सहसा पुर्नविक्रीसाठी नाही. जर एखाद्या ग्राहका सोबत अन्याय होत असेल तर त्याला योग्य न्याय मिळवुन देण्याचा प्रयत्न करील आणि ग्राहकांच्या काही समस्या आढळुन आल्यास सोडविण्याचा प्रयत्न करील, असे ऋषभ बावनकर यांनी सांगितले.

